Advertisement

संघर्ष हा यशाचा राजमार्ग -प्रा. विश्वंभर बाबर


म्हसवड… प्रतिनिधी
समाजात चांगली व्यक्ती होण्यासाठी संघर्ष हाच यशस्वी जीवनाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड येथे इयत्ता 12 वी विद्यार्थी शुभचिंतनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते, तर प्रमुख मान्यवर म्हणून देवापुरचे सरपंच व संस्था संचालक तात्यासाहेब औताडे, म्हसवड पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश कांबळे, संस्था सचिव सुलोचना बाबर,प्राचार्य विठ्ठल लवटे व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना विश्वंभर बाबर म्हणाले जीवनाच्या शर्यतीत दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा. चांगल्या गोष्टी घडत नसतात विद्यार्थ्यांनो तुम्हाला त्या घडवाव्या लागतील. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनही उसने मिळत नाही ते निर्माण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करण्याचे आवाहन प्रा. बाबर यांनी केले.
यावेळी बोलताना संस्था सचिव सुलोचना बाबर म्हणाल्या जीवनात नेहमी सकारात्मक राहून प्रयत्न करा. तुम्ही कोणते क्षेत्रात जा मात्र आई वडील व गुरुजींना कधीही विसरू नका. आम्ही कसे घडलो याबाबत पत्रकार महेश कांबळे व सरपंच तात्यासाहेब औताडे यांनी आपली माहिती कथन केली व इयत्ता बारावीचे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी दीपक काटे यांनी तर विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा शिर्के, राजनंदनी घोगरे, व मुद्रा जाधव यांनी अत्यंत भावनिक मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थितताना आपले अश्रू आवरता आले नाहीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कुंटे व अनुष्का तुपे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पल्लवी देशमुख मॅम यांनी व्यक्त केले.

तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झोकून द्यावे- मदन पाटील

मुरुम, ता. उमरगा, ता. १८ (प्रतिनिधी) : देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी ग्रामसफाई, पाण्याची बचत, पर्यावरणाचे संवर्धन, निती मूल्याचे शिक्षण, जातीय सलोखा, आरोग्य संवर्धन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही विशेष शिबिरे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे, तर मानसिक, सामाजिक, भावनिक विकास करून तरुणांना चांगले नागरिक बनण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरतात. राष्ट्र अभिमान जोपासण्यासाठी तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झुकून द्यावे, असे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील यांनी केले. नाईक नगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिराप्रसंगी शनिवारी (ता. १८) रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव राठोड होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, माजी उपसभापती गोविंद पाटील, माजी नगराध्यक्ष रशिद शेख, योगेश राठोड, डॉ. सतिश शेळके, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्राचार्य रमेश जाधव, उपमुख्याध्यापक उल्हास घुरेघुरे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बापूराव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे भूमिपूजन झाडाला आळे व पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना मदन पाटील म्हणाले की, सध्या तरुणांसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानावर मात करण्याकरिता या परिसरातील तरुणांनी आरोग्याची काळजी घेणे, वाढती व्यसनाधीनता आणि मोबाईलचा अतिरेकी वापर टाळणे गरजेचे आहे. युवकांनी तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल साक्षर बनणे गरजेचे असल्याचे शेवटी ते म्हणाले. डॉ. सतिश शेळके, योगेश राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रतापसिंग राजपूत, डॉ. शिला स्वामी, डॉ. रविंद्र आळंगे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. विलास खडके, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. संध्या डांगे, विद्यार्थी प्रतिनिधी धीरज मुदकन्ना, विद्यार्थिनी प्रतिनिधी मनिषा पुराणे आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक सपाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. अशोक बावगे यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.               

    फोटो ओळ : नाईक नगर, ता. उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराप्रसंगी मदन पाटील बोलताना बापूराव पाटील, माणिक राठोड, गोविंद पाटील, व्यंकटराव जाधव, योगेश राठोड, अशोक सपाटे व अन्य.

सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी आक्रोश मोर्चाचे आयोजनदेशमुख व सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य राहणार उपस्थित

(रामेश्वर कोरे )

पंढरपूर- सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखंड मराठा समाजाचा सोलापूर जिल्ह्याच्यावतीने बुधवार २२ रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर येथील समन्वयक रवी मोहिते यांनी दिली.

या मोर्चास संघर्षयोध्दा मनोज जरांगे-पाटील, आमदार सुरेश धस यांच्यासह देशमुख व सूर्यवंशी यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत.

याबाबत माहिती देण्यासाठी मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यास माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, कुर्दूवाडीचे संजय टाणपे, संभाजी ब्रिगेडचे दीपक वाडदेकर, किरण घाडगे, स्वराज पक्षाचे महादेव तळेकर, किरण भोसले, दिगंबर सुडके, विनोद लटके, महेश पवार, आकाश पवार, बंटी भोसले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोहिते यांनी, सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहेच, परंतु परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची देखील पोलीस कोठडीत हत्याच केली असल्याचा आरोप केला. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.

तर दीपक वाडदेकर यांनी,
या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी तसेच यातून आरोपींची नावे वगळली जाऊ नयेत यासाठी आक्रोश मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती दिली.

सदर मोर्चा बुधवार २२ रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार आहे. या आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच खासदार बजरंग सोनवणे, संभाजीराजे छत्रपती, अण्णासाहेव पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, दीपक केदार हे देखील उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

फलटण हायस्कूलचा चित्रकला ग्रेड परीक्षेत १०० % निकाल.

जयभवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीच्या फलटण हायस्कूल,तांत्रिक विभाग व ज्युनि.कॉलेज फलटणचा सन २०२४-२५ चित्रकला इलेमेंटरी व इंटरमेजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल १००% लागला.या यशस्वी विद्यार्थ्यांना श्री.वाघमारे सर यांनी मार्गदर्शन केले.

        सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे जयभवानी  एज्युकेशन सोसायटी गिरवीचे अध्यक्ष श्री.सह्याद्रीभैया चिमणराव कदम, जयभवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीच्या सचिव श्रीमती शारदादेवी चिमणराव कदम, सातारा जिल्हा परिषद सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ प्रभावती कोळेकर,फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री अनिल सपकाळ,फलटण हायस्कूल चे प्राचार्य.श्री. काळे डी.एल.सर,

श्री.मांढरे सर,श्री.धुमाळ सर,श्री.चव्हाण सर,सौ.लोखंडे मॅडम,श्री.वसावे सर,श्री. खलाटे सर,चौगुले मॅडम, सौ.धेंडे मॅडम व श्री.दडस सर यांनी हार्दिक अभिनंदन केले.

सपोनि अक्षय सोनवणे टिम नंबर वन

दहिवडी पोलीस ठाणे ठरले सन 2024 मधील सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन

सातारा (विजय टाकणे)
माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम यांच्या हस्ते सपोनि अक्षय सोनवणे आणि सहकाऱ्यांना सन 2024 मधील तब्बल 62 पुरस्कार प्राप्त आणि डिसेंबर 2024 मध्ये 7 पुरस्कारांनी सन्मानित

सविस्तर वृत्त
माननीय पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख सर यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्याचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी पोलिसांनी नागरिकांकरिता जी कामे करणे अपेक्षित आहे आणि ते काम करताना पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रेरणा मिळावी किंवा कामाचे कौतुक व्हावे याकरिता त्या त्या कामाप्रमाणे पुरस्कार देण्याचे आयोजित केलेले होते. यामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महिला पथदर्शी प्रकल्प म्हणजेच पोलीस काका दिली हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमा अनुषंगाने पोलीस ठाण्यातील महिला आणि पुरुष अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, महाविद्यालय, अकॅडमी येथे जाऊन मुला मुलींना गुड टच बॅड टच, पोक्सो कायद्याचे मार्गदर्शन त्याचबरोबर अटीतटीच्या प्रसंगी डायल 112 ला फोन करणे, स्वसंरक्षण कार्यशाळा अशा पद्धतीचे मार्गदर्शन करत होते. त्याचबरोबर गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल हा पुढील सुनावणी कामी माननीय न्यायालयात जमा करणे त्याचा पाठपुरावा करणे या अनुषंगाने मुद्देमाल निर्गती पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त मुद्देमाल निर्मिती करण्यात आला होता. तसेच माननीय न्यायालयात हजर न राहणारे आरोपी, साक्षीदार यांच्यामुळे कोर्ट केसेसचा निकाल लागण्यास उशीर होत असल्याने नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यासाठी सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार आयोजित केला होता या अनुषंगाने 100 पेक्षा जास्त आरोपींना अटक करून माननीय न्यायालयात हजर केले होते आणि गंभीर गुन्ह्यांमधील केसेसमध्ये फिर्यादी, साक्षीदार हे फितूर होऊ नये व आरोपींना शिक्षा लागून फिर्यादीला न्याय मिळावा या उद्देशाने सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्कार देखील आयोजित केलेला होता. या अनुषंगाने कोर्ट मध्ये साक्ष दरम्यान साक्षीदार, पंच यांना मार्गदर्शन करण्यात येत होते. दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी सन 2024 मध्ये तब्बल 62 पुरस्कार मिळवले असून डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये डिसेंबर महिन्यातील खालील प्रमाणे पुरस्कार प्राप्त झालेले असून रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन दहिवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांना गौरविण्यात आलेले आहे.

1) सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार संपूर्ण सन 2024 आणि डिसेंबर 2024,2) सर्वोत्कृष्ट मुद्देमाल निर्गती पुरस्कार सन 2024 आणि डिसेंबर 2024 ,3) सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार संपूर्ण वर्ष 2024 आणि डिसेंबर 2024,4)सर्वोत्कृष्ट दोष सिद्धी पुरस्कार डिसेंबर 2024.

वरील पुरस्कार हे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते सातारा क्राईम मीटिंगमध्ये दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार विलास कुऱ्हाडे, महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस, पोलीस हवालदार विशाल वाघमारे, महिला पोलीस नाईक नीलम रासकर, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी चंदनशिवे यांना मिळाले आहेत. या संपूर्ण पुरस्कारांमुळे दहिवडी पोलीस ठाणे हे सातारा जिल्ह्यातील सर्वच कामगिरीमध्ये बेस्ट पोलीस स्टेशन ठरलेले असून सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन चा बहुमान हा दहिवडी पोलीस ठाण्यास मिळालेला आहे.

error: Content is protected !!