Advertisement

म्हसवड पोलीस नावालाच, बाजारात व्यापारी त्रस्त!

दुचाकीचा भार, व्यापार्यांचे हाल, अठवडा बाजारातील बोलके चित्र

म्हसवड दि. १
माण तालुक्यात सर्वात मोठा अठवडी बाजार म्हसवड या शहरात भरतो या अठवडी बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने शहराच्या अर्थकारणास यामुळे मोठी ‌मदत होत आहे, असे असले तरी सध्या हा अठवडा बाजार दुचाकीमुळे वेगळ्याच चर्चेत आला असुन अठवडी बाजारातील दुचाकींच्या गर्दीमुळे बाजारसाठी जागा अपुरी पडु लागल्याचे चित्र आहे.
म्हसवडसह पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी व नागरीकांसाठी येथील अठवडी बाजार हा अतिशय महत्वाचा आहे, या बाजारवरच शहराचे अर्थकारण सुरु आहे या शिवाय येथील छोट्या, छोट्या व्यावसायिकांनाही याचाच खुप मोठा आधार आहे, माण तालुक्यात सर्वात मोठा अठवडी बाजार म्हणुनही म्हसवड शहरात भरणार्या अठवडी बाजारची विशेष ओळख आहे. हा अठवडी बाजार पालिका इमारतीसमोरील बाजार पटांगण याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरतो, तर बस स्थानक चौक ते विठ्ठल – रुक्मिणी मंदिर या दरम्यानच्या रोडवरीही मोठ्या प्रामाणावर छोटी, छोटी दुकाने अनेकजण लावत असतात, मात्र या दरम्यानच्या रस्त्यावर अनेकदा दुचाकी व चारचाकी वाहने उभी असतात त्यामुळे बुधवार म्हटले की येथे वाहतुक कोंडी ही ठरलेली असते, वाहतुक पोलीसही कोणीतरी फोन केल्यावर याठिकाणी येवुन ती वाहतुक कोंडी सोडवतात मात्र तो पर्यंत वाहतुक कोंडींंमुळे होणारे धुराचे प्रदुर्षण व कर्नकर्कश्य हॉर्नमुळे बाजारातील सर्वजणच हैरान होतात, तर दुचाकींची संख्या याठिकाणी मोठी असुन येथील अठवडी बाजारात येणारे छोटे, छोटे व्यापारी हे ज्या जागेत आपली दुकाने लावतात त्याच ठिकाणी आपली दुचाकी व चारचाकी वाहने लावत असल्याने इतर छोट्या व्यावसायिकांना आपली दुकाने लावण्यासाठी जागा शिल्लक रहात नाही, परिणामी अनेक शेतकर्यांना बाजारात जागा न मिळाल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेला भाजी पाला बड्या व्यापार्याला विकावा लागतो. या अठवडी बाजारात जर याच परिसरातील शेतकर्यांना जागा उपलब्ध होत नसेल तर ही मोठी खेदाची बाब आहे, यासाठी पालिका प्रशासनाने गंभीरपणे पाऊले उचलुन एक ही दुचाकी बाजार तळावर लावु देवु नये तर मुख्य रस्त्यावर वाहतुक कोंडी होणार नाही याची खबरदारी पोलीसांनी घेतल्यास निश्चितच म्हसवड शहराचा अठवडी बाजार हा आदर्श बाजार भरेल यासाठी पालिका प्रशासनाची व पोलीस प्रशासनाची मानसिकता फार महत्वाची आहे.

फोटो –

अक्कलकोट तालुक्यातील मैदरगी जवळ अपघात.४ भाविक ठार.

सोलापूर : वार्ताहर
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं जगभरात स्वागत केलं जात आहे. आज सकाळपासूनच सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून सुविचार अन् नव्या संकल्पासह नव्या वर्षाची सुरुवात केली जात आहे. राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून शिर्डी साईबाब, शेगावच्या गजानन महाराज, पंढरीच्या पांडुरंगाला आणि अक्कलकोटच्या (Akkalkot) स्वामी समर्थ चरणी नततमस्तक होण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली आहे. मात्र, अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात (Accident) झाला असून यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील या भीषण अपघातात 4 भाविक जागीच ठार झाले असून इतर 7 जण जखमी आहेत. यातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. स्कोर्पिओ कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक बसल्याची दुर्दैवी घटना घडली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे देवदर्शन करुन गाणगापूरकडे जात असताना सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारमधील 2 महिला आणि 2 पुरुष जागीच ठार झाले असून इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल असून जखमीना तातडीने अक्कलकोट येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी देखील पोलिसांनी संपर्क साधला आहे.

जि.प. शाळेचे पोवाडा स्पर्धेत अतुलनीय यश

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी शाळा नंबर १ व ३मधील व
विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या वर्षी
पोवाडा स्पर्धा मध्ये अतुलनीय यश.

गोंदवले –
सातारा जिल्हा परिषद सातारा आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा २०२४ अंतर्गत शाहिरी पोवाडा स्पर्धा
लहान गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नं.१ व ३ चे सलग दुसऱ्या वर्षी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरीय पोवाडा स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे,गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे,विस्तार अधिकारी रमेश गंबरे ,केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड,मुख्याध्यापिका सुनिता यादव ,महादेव महानवर ,शिक्षिका केशर माने,मनिषा बोराटे,रश्मी फासे,रेखा जगदाळे ,मिनाक्षी दळवी,दराडे मॅडम,नम्रता चव्हाण,माया तंतरपाळे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अध्यक्ष व सदस्य, पालक व ग्रामस्थ आदींनी कौतुक केले.यासाठी शिक्षक सागर जाधव विशेष परिश्रम घेतले तर विशाल इंगळे व सौरभ माने यांनी मार्गदर्शन केले.


छाया – पोवाडा सादर केलेले यशस्वी विद्यार्थी (विजय ढालपे)

error: Content is protected !!