Advertisement

भाजपच्या माध्यमातून भादे गटात विकासकामे मार्गी लावणार- मा.आनंदराव शेळके-पाटील

लोणंद (प्रतिनिधी -)–
(मा.सभापती, समाजकल्याण समिती सातारा)
राजकीय कारकिर्दीत पंचायत समिती, जिल्हा परिषदेत जनतेने संधी दिल्यापासून आत्तापर्यंत मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे, यापुढेदेखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भादे जिल्हा परिषद गटात सर्वांगीण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण समितीचे माजी सभापती मा.आनंदराव शेळके-पाटील यांनी केले.
खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या निधीतून कराडवाडी येथील वाघोशी रस्ता ते कोळेकर घर कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ वेळी शेळके-पाटील बोलत होते.
यावेळी जेष्ठ नेते शरदकाका देशपांडे, खंडाळा पुर्व मंडल अध्यक्ष देविदास चव्हाण, भापजा जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके-पाटील, कार्यकारिणी सदस्य अनिल कुदळे, गोरख धायगुडे, नारायण ठोंबरे, बापूसाहेब खोपडे, प्रकाश कराडे, दिलीप कराडे, शरद कराडे, मल्हारराव कराडे, कुंडलिक ठोंबरे, विठ्ठल केसकर, विकास ननवरे, पोलीस पाटील शुभांगी कराडे, दिपाली कराडे, ग्रामसेवक राऊत उपस्थित होते.
यापुढील काळात असाच विकास होणेसाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे रहावे अशी अपेक्षा शेळके-पाटील यांनी केली.
भादे जिल्हा परिषद गटातील नागरिकांची विकासकामे, मूलभूत गरजा या महत्वकांशी मानून त्या प्रामुख्याने सोडवल्या जातील असा विश्वास भाजप जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी दिला.
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून देऊ अशी ग्वाही सरपंच शरद कराडे यांनी यावेळी दिली.
स्वागत गोरख कराडे यांनी केले व आभार रामभाऊ कराडे यांनी मानले.

मूकबधिर विद्यालयास प्रोजेक्टर भेट !

अनिल वीर
सातारा : येथील समता प्रसारक मंडळ संचालित मूकबधिर विद्यालय येथे सागर दिलीप कांबळे यांनी त्यांच्या पहिल्या पगारातून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर भेट दिला आहे.
विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन व्हावे. विज्ञानातील संकल्पना सोप्या व स्पष्ट होण्यासाठी या प्रोजेक्टरचा उपयोग होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता जगताप यांनी सागर कांबळे यांचे
विद्यार्थ्यांनी तयार केलेले गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.किरण जगताप यांनी प्रास्ताविकपर सागर कांबळे यांची शिक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट केली.सागर कांबळे यांनी या उपकरणाचे फायदे समजावून सांगितले व प्रात्यक्षिक करून दाखविले.सदरच्या कार्यक्रमास शिक्षक,कर्मचारी व अध्यानार्थी उपस्थीत होते.सुरेश जगताप यांनी आभार मानले.

फोटो : सागर कांबळे यांचा सत्कार करताना मुख्याध्यापिका हेमलता जगताप शेजारी मान्यवर व अध्यानार्थी.(छाया-अनिल वीर)

म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर सुनील पोरे यांच्या पाठपुराव्यामुळे दिवड- म्हसवड रस्त्याचे काम सुरू

म्हसवड वार्ताहर
म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर सुनील पोरे यांच्या पाठपुराव्यामुळे दिवड म्हसवड रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नवी दिल्ली, नागपूर, म्हसवड – दीर्घ पाठपुरावा आणि लोकहितासाठी अखंड प्रयत्न करणारे इंजि. सुनील पोरे यांच्या पुढाकाराला अखेर यश मिळाले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये दिल्ली येथे ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन, म्हसवड परिसरातील जनतेसाठी अत्यंत महत्वाचा असलेला सातारा-पंढरपूर मार्ग तत्काळ पूर्ण करावा, यासाठी इंजि. पोरे यांनी आमरण उपोषण केले होते. त्यानंतर या रस्त्याचे मुख्य काम मार्गी लागले, मात्र काही ठिकाणी अपूर्ण असलेली पूल व मोऱ्यांची कामे न संपल्याने नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता.

या गंभीर बाबीकडे एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कामे पूर्ण झाली नाहीत.

त्यामुळे परिस्थितीचा गांभीर्य ओळखून, ३१ मे रोजी नागपूर येथे पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, अपूर्ण असलेल्या पुल व मोऱ्यांची कामे तत्काळ पूर्ण करण्याची ठाम मागणी इंजि. सुनील पोरे व त्यांच्या शिष्टमंडळाने केली. यावर मंत्री गडकरी यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले.
त्याचाच परिणाम म्हणून आज म्हसवड व दिवड येथील अपूर्ण पुलांच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात झाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जनतेच्या आवाजाला न्याय मिळवून देणाऱ्या इंजि. सुनील पोरे यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सातारा-पंढरपूर मार्ग परिसरातील प्रवाशांसाठी, शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी ही विकासाची महत्त्वाची पायरी ठरणार आहे, असा विश्वासही नागरिक व्यक्त करत आहेत.

error: Content is protected !!