Advertisement

चिल्लर देता का? चिल्लर, व्यापारी वर्गाला डिजिटल फटका.

डिजिटल व्यवाहाराने बाजारपेठेत सुट्टया पैशाची, चलनी नोटांची चणचण

म्हसवड दि. १४
आर्थिक व्यवहारात अधिक स्पष्टता यावी यासाठी भारत सरकारने डिजीटल ( करंन्सी ) व्यवहार धोरण अवलंबले असल्याने गल्लीपासुन ते दिल्ली पर्यंत सर्वत्र सर्रासपणे आता डिजीटल व्यवहार होत आहेत, त्यामुळे व्यावसायिकांच्या थेट बँक खात्यात रक्कम जात असल्याने दुकानदारांच्या गल्ल्यात कमी अन् खात्यात रक्कम जमा होत आहे, याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला असुन बाजारपेठेत चलनी नोटांची व सुट्टया पैशांची मोठी चणचण भासु लागली आहे.
डिजीटल भारत ची संकल्पना सर्वत्र राबवली जात असल्याने छोट्या दुकानदारांपासुन ते मोठ्या व्यावसायिकांपर्यमत सर्वच ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल व्यवहार होत आहेत, आपल्याकडे तुलनेने सर्वाधिक डिजीटल व्यवहार होण्याचे प्रमाण वाढले आहे त्याला शासनाकडुनच चालना दिली जात असल्याने गल्ली ते दिल्ली डिजीटल व्यवहार वाढले आहेत, याचा परिणाम दैनंदिन व्यावसाय करणार्या छोट्या दुकानदारांवर झाला आहे. बाजारपेठेत अगदी ५ रुपयांपासुन ते ५ हजारांपर्यंत चे व्यवहार डिजीटल होत असल्याने बाजारपेठेत चलनी नोटांची कमतरता व्यापार्यांना व सामान्यांही अधिक जाणवत आहे, तर सुट्टया पैशाची ही मोठी चणचण निर्माण झाली आहे.
पूर्वी सुट्टया पैशाचे करायचे काय असा प्रश्न सर्वांसमोर होता आता सुट्टे पैसे ही मिळेनात अशी परिस्थिती झाली आहे. यापुर्वी सुट्टया पैशाची चणचण भासल्यास व्यापारीवर्ग मंदिरातील पुजार्याकडे धाव घेत होता, आता मंदिरातही भाविक दक्षिणा व देणगी ऑनलाइन स्वरुपात देवु लागल्याचे चित्र आहे. दैनंदिन व्यवहारात १००, २०० व ५०० रुपयांच्या नोटा अधिक असल्याने ५०, २० व १० च्या नोटांचे प्रमाण कमी झाले आहे त्याचा परिणाम छोट्या दुकानदारांवर झाला आहे. पुर्वी बँकेतुन रक्कम काढणार्या ग्राहकाला ठरावीक रकमेची चिल्लरची पाकिटे दिली जायची आता तीच पाकिटे शोधण्याची वेळ सामान्य ग्राहक व छोट्या दुकानदारांवर आली आहे, तर दैनंदिन व्यवहारात असलेल्या चलनी नोटांची अवस्था फारच गंभीर आहे.

ट्रिपच्या नावाने 15 लाखांची फसवणूक


ट्रिपच्या नावाने 15 लाखांची फसवणूक
सातारा : उत्तर आणि दक्षिण भारत तसेच दुबईत कंपनीची ट्रीप जाणार आहे, म्हणून बुकींगसाठी पैसे घेऊन 15 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत रामचंद्र वारागडे (वय 59, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार मयुरेश वाघ, काजल निमसे, सपना वाघ, शुभांगी कदम, अनुजा आणि सुवर्णा भालेराव (संपूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

जयराम स्वामी वडगाव येथे पंधरा रोजी अवयव दान जनजागृती कार्यक्रम

जयराम स्वामी वडगाव येथे पंधरा रोजी अवयव दान जनजागृती कार्यक्रम

मायणी प्रतिनिधी-खटाव तालुक्यात प्रसिद्ध असणाऱ्या जयराम स्वामी वडगाव येथील 15 रोजी मंगळवारी अवयव दान जनजागृती कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रशालेचे प्रमुख जयवंत घार्गे यांनी दिली सदरचा कार्यक्रम जयराम स्वामी विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज व कोमल न्यू लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंगेश जी चिवटे कक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मुंबई हे भूषवणार आहेत तसेच प्रमुख मार्गदर्शन कॉमन न्यू लाइफ फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गोडसे करणार आहेत. तसेच केंद्रीय समन्वयक अवयव प्रत्यारोपण समितीचे आर्थिक गोखले मॅडम उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे अविनाश काशीद सदस्य फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन हेही उपस्थित राहणार आहेत .
तरी अवयव दान जनजागृती कार्यक्रमास पालक ग्रामस्थ यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन हुतात्मा मंडळाचे उपाध्यक्ष अंकुश घारगे यांनी केले आहे.

“द जर्नालिस्ट असोसिएशन” दिल्ली यांचे नॅशनल लिगल सेलच्या,सोलापूर जिल्ह्याध्यक्ष पदी ॲड शिवाजी शा.कांबळे यांची निवड.

“द जर्नालिस्ट असोसिएशन” दिल्ली यांचे नॅशनल लिगल सेलच्या,सोलापूर जिल्ह्याध्यक्ष पदी ॲड शिवाजी शा.कांबळे यांची निवड.

सोलापुर प्रतिनिधी ,
लोकशाहीचा चौथा स्तंभ जर्नालिझम असुन त्याकरीता राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था “द जर्नलिस्ट असोसिएशन दिल्ली” यांचे नॅशनल लिगल सेल, सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ व अभ्यासु विधीज्ञ ॲड. शिवाजी शा.कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
नॅशनल लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राकेशजी यादव तसेच राष्ट्रीय सरचिटणीस मा. ॲड. अयुब पटेल यांनी नुकतीच त्यांची निवड केलेली आहे. यावेळी सोलापूरचे नुतन जिल्ह्याध्यक्ष ॲड शिवाजी शा. कांबळे यांनी त्यांचे मत व्यक्त करत असताना संस्थेच्या राष्ट्रीय धोरणानुसार विधी सेवा देण्याचा मनोदय व्यक्त केला.
तसेच राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था द जर्नलिस्ट असोसिएशन दिल्ली यांनी केलेल्या निवडी बद्दल या संस्थेचे आभार मानले आहे.
या निवडी बद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!