Advertisement

बापुराव थोरात मायणी येथून हरवले

मायणी प्रतिनिधी—
मायणी तालुका खटाव येथील बागायतदार शेतकरी तानाजी दत्तू थोरात वय 65 हे मायणी लक्ष्मी नगर येथून गायब झाले आहेत या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे याबाबत मायणी पोलीस स्टेशनला हरवलेबद्दल गुन्हा नोंद झाला आहे तरी कोणास दिसल्यास बापूराव थोरात यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही मायणी पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी केले आहे.

पत्रकार रमेश आढाव यांचे दुःखद निधन

फलटण वार्ताहर
प्रा.रमेश आढाव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुका अध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव वय 63 यांचे नागपूर येथे गुरुवारी रात्री हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले आहे.

   त्यांचे पार्थिव शनिवार दि.19 रोजी सकाळी 7 वाजता गुणवरे ग्रामपंचायत येथे अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, तेथूनच अंत्ययात्रा निघेल त्यानंतर गुणवरे येथील त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकारांच्या वतीने सराना भावपुर्ण श्रद्धांजली

दि १९ रोजी वडूज येथे जागृत ग्राहक राजाचा विभागीय अभ्यास वर्ग.


वडूज, दि 17 ( प्रतिनिधी )
ग्राहक चळवळीतील अग्रणी असलेल्या जागृत ग्राहक राजा संस्थेच्या वतीने दि १९ जुलै रोजी अंबिका हॉल, कुरोली रोड, वडूज येथे एक दिवसीय विभागीय कार्यकर्ता अभ्यास वर्ग आयोजित केला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप पाटील, संघटक दिलीप फडके व सचिव नागनाथ स्वामी यांनी दिली.
या वर्गात सातारा, पुणे व सांगली व पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते व राज्य संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.या वर्गास दिलीप निंबाळकर, बाळासाहेब घुगरे, सौ साधना पाटील यांचेसह राज्य पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक.

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ पदाधिकाऱ्यांसोबत अधिस्वीकृती संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये १००% प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र, या सवलतीवर ८,००० किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी असे मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले. यामुळे पत्रकारांना जिल्हा व तालुका पातळीवर देखील सेवा देता येईल.
….

error: Content is protected !!