फक्त,जयाभाऊ! म्हसवडकरांच्या पाठीशी,

Spread the love

विशेष वृत्त

नुकसानग्रस्तांचे पंचनामे तातडीने करा – जयकुमार गोरे

म्हसवड, प्रतिनिधी

संततधार पावसामुळे झालेल्या पाणी साचल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुकानांमध्ये पाणी शिरून मालसाठा नष्ट झाला असून व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. या नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा ऐकत राज्य शासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्या.

शनिवारी रात्री झालेल्या पावसात म्हसवड शहरातील मुख्य बाजारपेठ, शिंदे गल्ली, गांधी चौक परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे दुकानातील साहित्य, मालसाठा व अन्य वस्तूंचे मोठे नुकसान झाले. व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे पीडित व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.

या पार्श्वभूमीवर आमदार गोरे यांनी रविवारी रात्री नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांनी थेट आपत्तीग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत नुकसानभरपाईसाठी लवकरात लवकर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या.

गोरे म्हणाले की, “नुकसानीची खरी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने कुठलाही विलंब न करता पंचनामे पूर्ण करावेत. शासनस्तरावरून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. व्यापाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

यावेळी तालुका प्रशासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!