मतदानचं चोरून घेतल तर भ्रष्टाचार काय आहे—— बच्चु कडू

Spread the love

पिक विम्यासाठी 1 रुपया का घेता— बच्चु कडू

भविष्यात अजित पवार व एकनाथ शिदे यांना सत्तेतुन बाहेर काढण्याचा भाजपचा डाव—— बच्चु कडू

पंढरपूर

पंढरपूर विश्रामगृह येथे प्रहार संघटनेचे संस्थापक तथा दिव्यांग मंत्रालयाचे विद्यमान अध्यक्ष बच्चु कडू यांची प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणुकित प्रहार सोलापूर जिल्हात आपले उमेदवार उभा करणार तसेच महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणुन संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ज्या विठ्ठलाची ओळख गोरगरीब, कष्टकरी यांचा देव म्हणून आहे. त्या पंढरीच्या पावन नगरीतुन सुरुवात करणार असल्याचे यावेळी बच्चु कडू यांनी व्यक्त केले. तर भविष्यात प्रहार संघटनेची ओळख पांडूरंगाच्या पंढरीतून संपूर्ण महाराष्ट्राला झाली पाहिजे. येणार्या सर्वच निवडूकि मध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आपली ताकत दाखवेल. पंढरपूर शहर व तालुक्यात गावं तिथं शाखा, गांव तिथं प्रहार हा उपक्रम जोरात राबवून गोरगरीब, दिव्यांग, विधवा, निराधार, कामगार यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करून गुन्हे दाखल झाले तरी चालतील असे परखड मत व्यक्त केले.
यावेळी ता. प्रमुख संतोष मोरे यांनी बच्चुभाऊ कडू यांचे आदेशाने व जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के व उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.
सर्व सामान्य माणसाला शासकिय कार्यालयात न्याय मिळत नसेल तर अधिकार्याना चोप देऊन साडे तीनसे गुन्हे अंगावर घेणारा बच्चु बच्चु कडू आहे. प्रहारच्या पदाधिकार्यांनी सुद्धा फक्त पद घेऊन बसण्या पेक्षा जर सर्व सामान्य जनतेला एखाद्या कार्यालयात वारंवार हेलपाटे घालवे लागत असतील तर आंदोलन करून अधिकार्याना चोप देऊन गुन्हे अंगावर घेतले तरी काय हरकत आहे असे मत बच्चु कडू यांनी पंढरीत व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!