खटाव तालुक्यातील जयराम स्वामी पालखीचे शनिवार 28 रोजी प्रस्थान

Spread the love

मायणी :प्रतिनिधी:

खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील सद्गुरु जयराम स्वामी यांच्या आषाढी पालखीचे प्रस्थान 28 रोजी शनिवारी वडगाव जयराम स्वामी येथून होणार असल्याची माहिती मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी दिली शनिवार 28 रोजी दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार असून सायंकाळी महसूरणे येथे मुक्काम आहे दिनांक 29 रोजी रविवारी दुपारी दोन वाजता महासुरणे प्रस्थान करून मायणी येथे मुक्काम होणार आहे सोमवारी दुपारी मायने येथून प्रस्तावना तर विभूतवाडी येथे मुक्काम होणार आहे मंगळवारी एक रोजी विभूतवाडी येथील प्रस्थान तर शेनवडी येथे मुक्काम होणार आहे बुधवारी दोन रोजी शेनवडी येथून प्रस्तावना होऊन दिघंची येथे मुक्काम होणार आहे तीन रोजी गुरुवारी दिघंची येथून प्रस्थान तर मोहोर येथे सायंकाळी मुक्काम होणार आहे तसेच चंद्रकांत बुरुंगले बंडगरवाडी कटफळ यांचे रानात जयराम स्वामी पालखीचे गोल रिंगण सोहळा संपन्न होणार आहे शुक्रवारी चार रोजी महूद प्रस्थान होऊन गादेगाव येथे मुक्काम होणार आहे तसेच शनिवार पाच रोजी गादेगाव येथून प्रस्थान होऊन जयराम स्वामी मठात पंढरपुर येथे मुक्काम आहे पालखीची परतवारी गुरुवारी 10 रोजी पंढरपूर ते बंडी शेगाव अकरा रोजी शेगाव ते भाळवणी शनिवार बारा रोजी भाळवणी ते पिलीव रविवार तेरा रोजी पिलीवती मसवड 14 रोजी म्हसवड ते गोंदवले मुक्काम मंगळवार 15 रोजी गोंदवले ते वडूज दिनांक 16 रोजी ते वडगाव जयराम स्वामी पालखीत सहभागी दिंड्या वडगाव, शामगाव, वांजोळी, मासुरणे, येडे उपाळे, कोतीज, अमरापूर, गोरेगाव पारगाव, कडेपूर, पुसेसावळी, राजाची कुलै, उंबर्डे, विहापूर, मुंबईकर, पोकळेवाडी, हिंगणगाव, लाडेगाव, डेरवण, उंची ठाणे, लाडेगाव, अतीत, जयराम स्वामी वडगाव, निमसोड, थोरवेवाडी, रेणुसेवाडी, ढाणेवाडी, व शेनवडी या दिंड्या सहभागी होणार आहेत असे विठ्ठल स्वामी यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!