मांसविक्री व मद्यविक्री कायमची तीर्थक्षेत्र पंढरपुरातून हद्दपार करण्यासाठी विश्व हिंदू परिषद पंढरपूरचे आंदोलन
पंढरपूर ता. २३
मांसविक्री आणि मद्यविक्री तीर्थक्षेत्र पंढरपूर मधून हद्दपार करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये आषाढीवारी साठी पंढरपूर मध्ये फक्त १० दिवसांसाठी मांस विक्री आणि मद्यविक्री बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकार काढणे आहेत परंतु विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरमध्ये अनेक वेळा आषाढी यात्रेमध्ये मांस विक्री व मद्यविक्री चालू असते हे पंढरपूर येथील नागरिकाच्या निदर्शनास आले म्हणून तीर्थक्षेत्र पंढरपुर शहरातून कायस्वरूपी मांस विक्री आणि मद्य विक्री पूर्ण बंद करावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आले.

तसेच 350 वर्षे पेक्षा अधिककाळ आषाढी वारी ही परंपरा चालत आहे या यात्रेमुळे भक्तीचा सागर आळंदी – देहूहून पंढरपूरला पायी चालत येतो या वारकऱ्यांच्या दिंडीमुळे त्रास होतो असं बोलणाऱ्या मंद व्यक्तीच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
वरील सर्व मागण्यांचे निवेदन पालकमंत्रीना देण्यात आले. या आंदोलनच्यावेळी विश्व हिंदू परिषदे पश्चिम महाराष्ट्र प्रांत समरसतेचे सदस्य रवींद्रजी साळे , जिल्हा मंत्री शिवाजीराव जाधव, सहमंत्री गोपाळ सुरवसे, बजरंग दल जिल्हा संयोजक श्रीनाथ संगीतराव , भाग्यश्री लिहिणे, गंभीरेताई, अक्षय मेनकुदळे, गोपाळ सुगंधी,जय सुरवसे अभंगराव, मलशेट्टी, शुभम करकमकर, गणेश महाराज तसेच आदि कार्यकर्ते उपस्थित होते.