
म्हसवड वार्ताहर…
नुकत्याच पार पडलेल्या विधान सभेच्या निवडणुकी मध्ये महायुती ला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले. महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आत्तापर्यंत चा सर्वात मोठा कौल होता. यामध्ये माण खटाव मध्ये भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय उमेदवार मा. जयकुमार गोरे भाऊ हे जवळ जवळ 50 हजार मतांनी निवडून आले. त्यांनी मिळवलेले हे चौथे यश होते.मा. जयकुमार गोरे हे सलग चार वेळा आमदार झाले. त्यांनी मारलेला हा विजयी चौकार विरोधकांच्या काळजात धडकी भरवणारा होता, विजयी मिरवणुकीत मध्ये सर्वांच्या नजरेत भरणारा “भावी मंत्री साहेब” हा बॅनर मा. नगराध्यक्ष नितिन भाई दोशी लावला होता.
निवडणूक निकाल लागल्यानंतर माण खटावचे आमदार मंत्री व्हावेत असे सर्वांनाच वाटत होते. परंतु
नितिन भाई दोशी यांनी या बॅनर द्वारे मा. भाऊ हे मंत्री होणारच असे दृढनिश्चयाने सूचित केले होते. त्यांनी तो बॅनर आपल्या दुकानसमोर लावला होता, आणि मा. आमदार जयाभाऊंना मंत्रिमंडळ शपथ विधी दिवशी सकाळीच मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी भाजपा पक्ष कार्यालयातून फोन आला आणि भाऊ नामदार झाले त्यामुळे या बॅनरची सर्वत्र चर्चा झाली. व अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.