बँक व्यवहार साक्षरता ही काळाची गरज-गौरव कल्याणकर

Spread the love


म्हसवड… प्रतिनिधी
शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना बँक व्यवहाराची माहिती गरजेची असून बँक व्यवहार साक्षरता ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी गौरव कल्याणकर यांनी म्हसवड येथे केले.
स्टेट बँक ऑफ इंडिया सातारा कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी गौरव कल्याणकर, प्रणव शिंदे तसेच म्हसवड शाखेचे मॅनेजर प्रशांत सुळ यांनी क्रांतिवीर इंग्लिश मिडियम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर,स्कूलचे प्राचार्य विन्सेंट जॉन, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गौरव कल्याणकर म्हणाले विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच बँकेच्या व्यवहाराची माहिती असणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार हा जीवनातील महत्त्वाचा घटक असून विद्यार्थ्यांना त्याची ओळख गरजेची आहे. यावेळी कल्याणकर यांनी अपघात विमा,एटीएम, आरटीजीएस, एनईएफटी, चेक, डीडी, ऑटो स्पेक फॅसिलिटी, म्युचल फंड, फोन पे,गुगल पे, इंटरनेट बँकिंग, शैक्षणिक कर्ज, पीक कर्ज, डेबिट कार्ड, मल्टिसिटी चेक सुविधा, बँक खाते उघडणे व त्यात किमान रक्कम ठेवणे इत्यादी बाबत माहिती दिली.
याबरोबरच उपस्थित शिक्षक व संस्था संचालकांना कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज बाबत सविस्तर माहिती दिली. या निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक अभिजीत सावंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!