
प्रतिनिधी – चैतन्य काशिद
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांचे आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी,ता.माण,जि.सातारा येथील निवासस्थानी येथे ठेवण्यात येणार आहे.बोराटवाडी येथे दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश, जयकुमार ,शेखर,कन्या सौ.सुरेखा,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
“कै. भगवानराव गोरे (दादा) यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”