आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यापुढे ठेऊन प्रशासनात काम करावे – मंदार गोंजारी

Spread the love

म्हसवड वार्ताहर

अनेक अधिकारी याच तालुक्याने महाराष्ट्राला आणि देशाला दिले आहेत. माण तालुक्यातील अनेक विद्यार्थांनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्याच सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलताना पुढे ते म्हणाले कि मी आल्यापासून बघत होतो यश जरी आपण संपादित केल असलं तरी आनंद मात्र पालकांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. आणि ज्यांच्यामुळे आपण यश संपादित केले त्या आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यापुढे ठेवून प्रशासनात काम करावे असे ते म्हणाले, पुढे ते म्हणाले म्हसवड सारख्या ठिकाणी कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या प्रत्येकाचा इथं सन्मान करून त्यांना शाबासकी ची थाप देणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नितिन भाई दोशी हे आहेत. त्यांच्या या आशीर्वाद रुपी सत्काराने अनेकांना प्रेरणा मिळते व पुढील वाटचाल आदर्श व संघर्षमय करून यशाची शिखरे पार करतात.
या कार्यक्रमात मध्ये प्रथम दिव्यांग असणारे विक्रम शेंडगे व अक्षदा विरकर यांचा मंदार गोंजारी यांचे हस्ते शाल व भेटवस्तू आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार स्कार्फ देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी संस्थेचे संचालक ऍड. भागवत, डॉ. मासाळ, व महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे संचालक व आदर्श शिक्षक लुनेश विरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि यश संपादन करताना करावा लागणार संघर्ष हा नक्कीच त्रासदायक असतो परंतु त्यातून मिळणारे यश हे मात्र अविस्मरणीय असते.
आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व म्हसवड नगरीचे माही नगराध्यक्ष नितिन भाई दोशी म्हणाले कि, विक्रम व अक्षदा यांनी जे यश संपादित केले त्यांचे कौतुक तर आहेच पण त्यांनी ज्या परिस्थिती मध्ये हे यश मिळवले ते मात्र वाखानण्याजोगे आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये म्हणाल तर विक्रम दिव्यांग असून त्याचे आई वडील मेंढपाळ आहेत. पॅरा ऑलिम्पिक मध्ये सुद्धा त्याची निवड झाली होती. आर्थिक पाठबळ नसलेने त्याला मैदानी खेळ सोडून त्याने राज्यसेवेचा अभ्यास करून हे अभूतपूर्व यश संपादन केले आहे. दुसरीकडे अक्षदा च्या घरची परिस्थिती सुद्धा हालखीचीच आहे. त्यामुळे राज्यसेवेची तयारी किंवा स्टडी सर्कल वगैरे ण जाता घरूनच अभ्यास करून यश संपादित केले आहे.
सत्कार मूर्तीच्या भाषणात बोलताना विक्रम शेंडगे म्हणाले कि, माझी पॅरा ऑलिम्पिक साठी दिव्यांगमधून निवड झालेली पण आर्थिक पाठबल नसलेने मी एम. पी. एस. सी. करून आर्थिक बाजू सक्षम करून मग पुढे जाईन. ते पुढे म्हणाले मी आर्थिक अडचणीत असताना माझे नातेवाईक माझा कॉल सुद्धा घेत नव्हते तेच नातेवाईक माझ्या यशाने मला पटकन कॉल करून शुभेच्छा देतात. सांगायचं एवढंच आहे जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही विचारनार नाही.
आपले मनोगत व्यक्त करताना अक्षदा म्हणाली कि,घरूनच अभ्यास करत होते, त्यामुळे घरच्यांचे हाल, गरिबी दिसत होती आणि एक दिवस सरकारी मिळवून त्यांचे होणारे हाल थांबायचे आणि ते मी करून दाखवलं.
या कार्यक्रम प्रसंगी नारायण मासाळ पंच,भानुदास मासाळ, नवनाथ मासाळ, डॉ. सतीश मासाळ, कृष्णराज शेंडगे,सुखदेव मासाळ, पांडुरंग नरुटे, बिरूदेव नरुटे,नामदेव मासाळ, शशिकांत ढोले, महावीर विरकर, ज्ञानदेव मासाळ,अक्षदा चे आईवडील, अहिंसा पतसंस्थेचे संचालक महावीर व्होरा, विजय बनगर, अजित मासाळ
मासाळवाडी व विरकरवाडी येथील ग्रामस्थ आणि अहिंसा पतसंस्थेतील कर्मचारी,अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले.तर हरिदास मासाळ यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!